स्टेअरिंग आणि देश..!

बोधकथा स्टेअरिंग आणि देश..!


      माणसाच्या आयुष्यामध्ये विनोद अत्यंत महत्त्वपूर्ण साधण आहे. विनोद आम्हाला खळाळून हसायला लावतं. आमच्या डोक्यावरचा तान नाहीसा करतो, चिंता विसरावयास लावतो. चिंतेमध्ये असणार्‍या, संकटात असणार्‍या, खिंन्न मनस्थितीमध्ये असणार्‍या व्यक्तिने एखादा छानसा विनोद ऐकावा आणि खळाळुन हसावं. आणि उदासीनता तर फेकूनच द्यावी ऐवढे सामर्थ यामध्ये आहे.    
        आजकाल दुरदर्शन किंवा अनेक वाहिण्यावर विनोदी कार्यक्रमाची लाट आलेली आहे. काही कार्यक्रम तर केवळ विनोदालाच वाहीलेले. वेगवेगळे विनोद सांगणारे ते विनोद सांगतात. सोबतच संगीत आणि असे कार्यक्रम मनाला भुरळ पाडतात. असाच एक कार्यक्रम पाहत होते आणि मग कार्यक्रमाचा विनोद सांगण्यात आला.
     एकदा काय़ होत. एक विमान अपघात होतो. आणि विमान अपघातमध्ये पायलट सह सर्व प्रवासी मरुन जातात. वाचतो तर फक्त एक माकड.  मग या माकडाची मुलाखात घेण्यासाठी सर्व चैनल वाले  त्याच्याकडे धाव घेतात. आणि माकडाला मग प्रश्न विचारतात माकड ऐटीमध्ये उत्तर देतो.
      पहिला पत्रकार माकडाला विचारतो की, अपघात झाला होता तेव्हा विमानातले प्रवासी काय करत होते? माकडाने आपले हात गालाजवळ नेले. मान वाकवली आणि ते झोपले होते हे पत्रकारांना लक्षात आले. मग पत्रकारांनी माकडाला दुसरा  प्रश्न विचारला, की, विमान चालविणारा चालक काय करत होता? मग पुन्हा माकडाने आपले दोन्ही हात गाला जवळ नेले मान वाकवली. डोळे मिटले आणि पत्रकार समजले की वैमानीक झोपला होता. मग तिसरा प्रश्न पत्रकाराने माकडाला विचारला की, तु काय करत होतास? आणि मग माकडाने दोन्ही हाताने स्टेरिंग फिरवण्याचा अविर्भाव करत हालचाल केली आणि सर्व पत्रकार समजले की, माकड विमान चालवत होता. आणि परिणाम स्वरुप नाही व्हायचं तेच झालं!
     आमच्या आजुबाजूचं वातावरणही असचं आमची राजकीय व्यवस्था ही असीच तर ज्यांनी विमान चालवायचं, ज्यांनी या देशाचा गाडा चालवायचा . असे जबाबदार नागरिक जर झोपुन राहीले. ज्यांच्या हाती या देशाचं सुकाणू दिलेलं आहे ते लोक आपल्या कर्तव्याला चुकून झोपा काढायला लागले, कर्तव्याला चुकू लागले, तर मग माकडाच्या हाती या देशाची स्टेअरिंग यायला वेळ लागणार नाही.
     विनोद काल्पणिक आहे. माकड काल्पणिक आहे परंतू देश मात्र वास्तव आहे आणि या देशामधली माकड देखील वास्तव आहे.  या माकडाच्या हाती जर या देशाचं स्टेअरिंग आलं तर या देशाचा विमान अपघातासारखा अपघात होऊन कपाळमोक्ष व्हायला वेळ लागणार नाही. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्य तद्न्याची गरज नाही.